Wednesday, October 19, 2022

पिकांचे पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई द्या- सुधीर भद्रे

 

महसूल अधिकाऱ्यांना निवेदन देताना सुधीर भद्रे व शेतकरी बांधव...

( छाया:सोहेल मनियार चिचोंडी पाटील )

चिचोंडी पाटील ( वार्ताहर ) 

नगर तालुक्यात व चिचोंडी पाटील मंडळामध्ये गेल्या आठ दिवसापासून होणाऱ्या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे शासनाने पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी


अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे जिल्हाध्यक्ष मा. श्री. सुधीरदादा भद्रे यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सुधीर भद्रे यांच्या नेतृत्वाखाली चिचोंडी पाटील ग्रामपंचायत कार्यालयापासून तलाठी कार्यालयावर शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढण्यात आला.


तलाठी व मंडळाधिकारी यांना सर्व शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळावी यासाठी निवेदन देण्यात आले.सर्व शेतकऱ्यांनी मोर्चामध्ये आपला सहभाग नोंदवून, शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन महसूल अधिकाऱ्यांना देण्यात आले.



No comments:

Post a Comment