Wednesday, July 28, 2021

डिझेल कारऐवढी झाली मागणी...दिवसेंदिवस वेगाने वाढतेय देशातल्या स्वस्त इलेक्ट्रिक एसयूव्हीची 'डिमांड'

 

पेट्रोल डिझेल या पारंपारिक इंधनाच्या दरांमध्ये सतत वाढ होत असताना आता वाहनचालकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे वाढत असल्याचं दिसतंय. 
मुंबई (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

कारण, देशातील प्रमुख ऑटो कंपनी टाटा मोटर्सची (Tata Motors) इलेक्ट्रिक एसयूव्ही निक्सॉन ईवीची (Nexon EV) मागणी गेल्या काही दिवसांत इतकी वाढलीये की आता या कारच्या डिझेल व्हेरिअंट इतकीच इलेक्ट्रिक एसयूव्हीलाही मागणी मिळत असल्याचं समोर आलं आहे. टाटा निक्सॉन डिझेल व्हेरिअंट इतकीच आता Nexon EV ची मागणी झाल्याचा दावा टाटा मोटर्सने केला आहे. जुलै २०२१ मध्ये Nexon EV आणि निक्सॉन डिझेलसाठी ग्राहकांकडून आलेल्या ऑर्डरचं प्रमाण सारखंच असल्याचं कंपनीने सांगितलं. टाटा मोटर्सचे मुख्य वित्तीय अधिकारी पी.बी.बालाजी यांनी याबाबत माध्यमांना सोमवारी माहिती दिली. जुलै २०२१ मध्ये निक्सॉन ईवीसाठी आणि डिझेल निक्सॉनसाठी ग्राहकांकडून समान प्रमाणात ऑर्डर आल्या असं बालाजी यांनी सांगितलं. "FAME-II योजना आणि राज्य सरकारांकडून दिली जात असलेली सब्सिडी या प्रमुख दोन कारणांमुळे इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढत आहे.


या स्मार्ट गावात महिलांसाठी ओपन जिमची सुरुवात

 

कोरोना काळात महिलांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी जिम सुरू करण्यात आली आहे.स्मार्ट ग्राम आठवड येथील ओपन जिम मध्ये उत्स्फूर्तपणे व्यायाम करताना महिला...(छाया : सोहेल मनियार)

चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)

सुदृढ आरोग्य हीच खरी संपत्ती

आज कोरोणाच्या काळात प्रत्येकाला आपली प्रतिकारशक्ती वाढविण्याची गरज आहे त्यासाठी आवश्यकता आहे ती दररोज व्यायामाची.नियमितपणे व्यायाम केल्याने आरोग्य उत्तम राहते.

नगर तालुक्यातील स्मार्ट ग्राम पुरस्कार प्राप्त आठवड येथे महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे.जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अहमदनगर यांच्या व्यायामशाळा विकास अनुदान योजनेमधून खुले व्यायाम साहित्य मिळाले आहे.

कोरोनापासून बचाव करावयाचा असेल तर त्यासाठी नियमितपणे व्यायाम गरजेचा आहे.स्मार्ट ग्राम आठवड येथे शासकीय योजनेतून मिळालेल्या साहित्याचा वापर करुन महिलांसाठी ओपन जिम ची सुरुवात केली आहे.हिरवाईने नटलेल्या आठवडच्या निसर्गरम्य परिसरात पहाटे व्यायाम करण्यासाठी महिला उत्स्फूर्तपणे सहभागी होतात.नियमित व्यायाम केल्याने आळस नाहीसा होऊन गावातील महिलांना कामामध्ये स्फूर्ती वाढत असून प्रसन्नता जाणवत आहे.

यापूर्वी गावामध्ये कोणत्याही प्रकारचे व्यायामाचे साहित्य उपलब्ध नसल्यामुळे व्यायाम करता येत नव्हता.उद्योजक विजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आठवड गावचे सरपंच राजेंद्र मोरे हे गावचा विकास उत्तम प्रकारे करीत असून त्यांच्यामुळे आज महिलांना याठिकाणी स्वतंत्रपणे व्यायाम करण्याची संधी मिळत आहे आणि यामधून महिलांचे आरोग्य ठणठणीत राहणार आहे. शारीरिक व्याधी,हाडांचे त्रास, मणक्यांचे त्रास,वाढलेले वजन स्थूलता यातून नक्कीच कमी होणार आहे.उद्योजक विजय मोरे व सरपंच राजेंद्र मोरे यांच्या उत्कृष्ट कार्यपद्धतीमुळे गावाचा कायापालट होत आहे अशी प्रतिक्रिया महिलांकडून मिळाली.या ठिकाणी महिलांना व्यायाम करण्यासाठी मार्गदर्शनही केले जाते.आठवड गावामध्ये स्वतंत्रपणे महिलांना व्यायाम करण्यासाठी जिमचे साहित्य उपलब्ध झाले त्याबद्दल महिलांनी उद्योजक विजय मोरे व सरपंच राजेंद्र मोरे यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया-

शासनाच्या व्यायाम शाळा विकास अनुदान योजनेमधून व्यायाम साहित्य आम्ही उपलब्ध करून महिलांसाठी ओपन जिमची सुरुवात केली.गावातील महिला रोज पहाटे व्यायाम करण्यासाठी उत्स्फूर्तपणे येतात.यापूर्वी गावात महिलांच्या आरोग्यासाठी कुठलीही सुविधा नव्हती. जिम सुरू केल्यामुळे महीलांची रोगप्रतिकार शक्ती,आरोग्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.आज गावात सर्वत्र स्वच्छता,पाणीपुरवठा, हागणदारीमुक्त गाव,कचऱ्याचे व्यवस्थापन पाहावयास मिळते. उद्योजक विजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आठवड गावचा विकास आम्ही करत आहोत.

- सरपंच

राजेंद्र मोरे ,आठवड





Friday, July 23, 2021

प्राथमिक शाळा काळेवस्ती येथे विद्यार्थ्यांसाठी घरोघरी शाळा उपक्रमाचे उद्घाटन ; कोविड-१९ च्या प्रादुर्भावामूळे शिक्षिका वृषाली घोडके यांचा अभिनव उपक्रम



विद्यार्थ्यांसाठी घरगुती शाळा उपक्रमाचे उद्घाटन करताना...(छाया : सोहेल मनियार)


अहमदनगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळे वस्ती, ता. नेवासा येथे सुरू असलेल्या घरोघरी शाळा या अभिनव उपक्रमांतर्गत इयत्ता तिसरी मध्ये शिक्षण घेत असलेली कु. तन्वी दत्तात्रय काळे  या विद्यार्थिनीच्या  घरातच तिच्यासाठी तयार केलेल्या स्वतंत्र शाळेचे उद्घाटन पंचायत समिती नेवासा येथील शिक्षण विस्तार अधिकारी विद्यादेवी सुंबे  यांच्या शुभहस्ते व भानस हिवरे केंद्राचे केंद्रप्रमुख गोपीनाथ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडले. 
कोविड-१९ च्या काळात १०० टक्के विद्यार्थ्यांचे  शिक्षण प्रभावीपणे सुरू ठेवण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळेवस्तीने प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी स्वतंत्र शाळा निर्माण करून , प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्याचा स्वतंत्र संचाचे मोफत वाटप केले आहे . तसेच नियमित गृहभेटीद्वारे घरोघरी शाळा हा अभिनव उपक्रम प्रभावीपणे सुरु केला आहे. सदर उपक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या स्वतंत्र शाळांपैकी कु. तन्वी दत्तात्रय काळे या विद्यार्थिनीच्या घरात सदर उद्घाटनाचा सोहळा पार पडला .सदर उद्घाटनासाठी मुलीच्या घरासमोर मंडप टाकण्यात येऊन घरासमोर आकर्षक रांगोळी काढण्याबरोबरच विद्यार्थिनीसाठी तयार केलेल्या शाळेला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती .सुरुवातीला तन्वी काळे या विद्यार्थिनीने सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. 

        शाळेच्या मुख्याध्यापिका  वृषाली घोडके  यांनी उपस्थित मान्यवरांना उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. सातारा जिल्ह्यातील वडगाव शाळेचे मुख्याध्यापक संजय खरात यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेल्या या उपक्रमामुळे १००% विद्यार्थ्यांचे शिक्षण  प्रभावीपणे सुरू ठेवता येते .तसेच पालक व शिक्षक यांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांची प्रगती  आनंदाने ,हसत खेळत व गतीने होण्यास मदत होते. सदर उपक्रमास पालक व विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. 

सदर उद्घाटनाच्या कार्यक्रमास केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. सुनंदा इधाटे , भानसहिवरे गावचे उपसरपंच अय्याज देशमुख, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील मोहिते , वर्षा ठाणगे , योसेफ मकासरे  उपस्थित होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी "घरोघरी शाळा" या उपक्रमाचे  कौतुक केले तसेच काळेवस्ती शाळेच्या मुख्याध्यापिका वृषाली घोडके  व सहशिक्षिका निता आनंदकर  यांचे हा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल खास अभिनंदन केले. व या  उपक्रमास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .

या अभिनव उपक्रमाचे स्वागत नेवासा गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे , विस्तारअधिकारी शिवाजी कराड, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यसंघटक राजेंद्र निमसे, राज्य उपाध्यक्ष सुनिल जाधव,जिल्हा सरचिटणीस सुनिल शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रणदिवे, माजी केंद्रप्रमुख प्रकाश घोडके आदींनी केले.

 

सदिच्छा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी घेतली शिक्षणाधिकाऱ्यांची भेट

संघ शक्ती -युगे युगे

शिक्षक संघ-कामात दंग

अहमदनगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार
नुकतीच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मा.शिक्षणाधिकारी शिवाजी शिंदे साहेब यांची भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करून निवेदन दिले.
यावेळी खालील प्रश्नांबाबत चर्चा झाली
१) शिक्षकांचे वेतन . C M P प्रणालीने व्हावे
२) २४ वर्ष सेवा पूर्ण झालेल्यां शिक्षकांचे निवड श्रेणी साठी  प्रस्ताव मागवावेत
३) वरीष्ठ श्रेणीचे प्रलंबित प्रस्ताव मंजुर करावेन
४) तालुकास्तरीय प्रलंबित बिलासाठी अनुदान उपलब्ध करून द्यावे
५)५० % उपस्थितीचे धोरण जिल्ह्यात समान असावे६
६) अवघड शाळा निश्चिती लवकर करावी
७) पी. एफ फंड प्रस्ताव मंजुर करावेत
८) सन २०२० = २१ चे पी एफ पाव
 त्या मिळाव्यात.
९) केंद्रप्रमुख बदल्या फक्त  १५ मे२०१४ च्या शासन निर्णया प्रमाणे फक्त विनंती कराव्यात,
वरील प्रश्नां बाबत चर्चा करताना मा. शिंदे साहेब यांनी सांगितले की ' शिक्षकाचे महत्वाचे तीन प्रश्न उदया मार्गी . लागत आहे. तुम्ही मांडलेल्या एक एक प्रश्नाचा अभ्यास करून ते मार्गी लावण्याचा प्रयल चालू आहे,
cmp नुसार वेतन करण्यात काही अडचणी आहेत त्या ऑगस्ट अखेर दूर करण्याचा प्रयल करू,
निवड श्रेणी प्रसाव मागवून घेतो,
मुख्याध्यापक केंद्रप्रमुख शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया लवकरच केली जाईन
वरीष्ठ श्रेणीचे प्रस्ताव १५ऑगस्ट नंतर मार्गी लावू
शिक्षक 50% उपस्थिती बाबत बोलताना त्यांनी द्वि शिक्षकी शाळां बाबत एका शिक्षकाने शाळेत थांबावे व एकाने गृहभेट करावी,
 शासन आदेश आल्या नंतर शाळा सुरु करण्यासाठी परवानगी दिली जाईन. शिक्षक संघाने शाळा सुरु करण्याची मागणी केली त्यावेळी त्यांनी वरील उत्तर दिले,
  निवडश्रेणी व पी.एफ. पावल्या मिळणे बाबत १५ ऑगस्ट नंतर भेटा,
सर्वच प्रश्न टप्याटप्प्याने मार्गी लावले जातील.
      आता शिक्षकांचे वेतन CMP होणार
  .. पण   ...
      जालना जि.प प्रमाणे शिक्षक वेतन CMP ने होणार नाहीत. 
    तर नगर जिल्ह्यात cmp ची पुढील पायरी म्हणून *प्रायोगिक तत्वावर नगर जिल्हा प्रथमच थेट कोषागरातून शिक्षकांच्या खातेवर पगार जमा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. . त्यासाठी मा मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी कोषागरातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून त्यांनी या बाबत सकारात्मक ता दाखवली आहे.
१५ ऑगस्ट नंतर शिक्षकांचे खाते  कोषागरात अपडेट करून दिल्यास शिक्षकांचे वेतन थेट कोषागरातून बँकेत पाठवले जाईन
मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.धनराज आंधळे साहेब यांनी त्यांना भेटून सविस्तर चर्चेअंती आश्वासित केले.
   नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर जी तांबे साहेब यांचे विशेष सहकार्य लाभ त आहे.
मा. तांबे साहेब यांना शिक्षक संघाच्या वतीने मनापासून धन्यवाद.
शिक्षकांच्यां वेतनासाठी कोषागरातून थेट बँकेत वेतन जमा करणारा नगर जिल्हा महाराष्ट्रात प्रथम ठरण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिक्षक संघ संपूर्ण सहकार्य करील. आवश्यकता वाटल्यास खाते अपडेट करण्यास शालार्थ टिमचे तज्ञ शिक्षक सहकार्यासाठी शिक्षण विभागाला देवू
    असे शिष्टमंडळाने मा आंधळे साहेब यांना सांगितले. ३१ ऑगस्ट पर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असे शेवटी मा. मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी सांगितले
 शिक्षक संघ व सदिच्छा मंडळाच्या शिष्टमंडळात शिक्षक संघाचे नेते राजेंद्र शिंदे अनिल आंधळे,बाळासाहेब खिलारी,संघाचे जिल्हाध्यक्ष माधव हासे, सदिच्छाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत ,शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन संतोष दळे राजेंद्र कुदनर ,संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजाभाऊ बेहळे ,किशोर शिंदे ,बाबा आव्हाड रहीमान शेख आदि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करा-सदिच्छा मंडळाची मागणी

 

अहमदनगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार


शिक्षक बँकेचे  विद्यमान संचालक मंडळाची मुदत मार्च 2021 रोजी संपलेली आहे तरीसुद्धा संचालक बोर्ड अनेक सभासद विरोधी निर्णय घेत आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे घड्याळ खरेदीत झालेला घोटाळ्याची 83 सहकार कायद्या अंतर्गत चौकशी चालू असल्यामुळे ती चौकशी निःपक्षपाती पणे व्हावी म्हणून संचालक बोर्ड बरखास्त करावे अशी मागणी सदिच्छा मंडळाच्या वतीने जिल्हा उपनिबंधक याना करण्यात आली.

        मागील जवळपास पाच वर्षांपासून संचालक मंडळ मनमानी कारभार करत आहे, याला वेळोवेळी सदिच्छा मंडळाने प्रखर विरोध केलेला आहे आता ही घड्याळ खरेदीची चौकशी 83 अंतर्गत चालू आहे त्यामुळे ही चौकशी निःपक्षपाती पणे व्हावी यासाठी हे मुदत संपलेले संचालक मंडळ तात्काळ बरखास्त करावे अशी मागणी आता सदिच्छा मंडळाच्या वतीने जोर धरू लागली आहे .
यासाठी नुकतीच सदिच्छा मंडळाच्या शिष्टमंडळाने जिल्हा उपनिबंधक साहेबांची भेट घेऊन बँकेत चालत असलेल्या गौरकरभराची चर्चा केली यावेळी शिक्षक नेते राजेंद्र शिंदे, अनिल आंधळे, शिक्षक संघाचे अध्यक्ष माधव हासे, सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष नारायण राऊत, माजी व्हॉईस चेअर मन संतोष दळे, सरचिटणीस राजेंद्र बेहेळे, बाळकृष्ण कंठळी, राजेंद्र कुदनर , किशोर शिंदे,उपस्थित होते.


Tuesday, July 20, 2021

धाकटी पंढरी कपारीच्या विठोबाच्या यात्रेवर कोरोनाचे सावट


धाकटी पंढरी,स्वयंभू कपारीचा विठोबा तीर्थक्षेत्र नांदूर येथील मंदिर..(छाया: सोहेल मनियार चिचोंडी पाटील)

चिचोंडी पाटील (प्रतिनिधी):अहमदनगर व बीड जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या नांदूर विठ्ठलाचे येथील धाकटी पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपारीच्या विठोबाच्या यात्रेवर कोरोनाचे सावट असल्याने विठ्ठल भाविकांचा हिरमोड झाला.मंदिराला कुलूप असल्याने भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता आले नाही. 

        आषाढी एकादशीनिमित्त तीर्थक्षेत्र नांदूर येथील कपारीच्या विठोबाची यात्रा सालाबादप्रमाणे दरवर्षी भरते. हजारो भक्तांच्या, दिंड्यांच्या उपस्थितीत,विठ्ठल नामाचा जयघोष करीत, टाळ, मृदुंग,पखवाज यांनी दुमदूमनारे रस्ते,पायवाटा,मंदिर परिसर, हजारो भाविक दिंडीत सहभागी होऊन,विठ्ठलाचा नामघोष करत, पायी चालत येऊन तसेच काही भाविक वाहनाने धाकटी  पंढरीला, स्वयंभू पांडुरंगाच्या दर्शनाला दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने येतात परंतु गेल्या वर्षी प्रमाणेच याही वर्षी कोरोना रोगाचा प्रादुर्भाव असल्याने, त्या अनुषंगाने विठ्ठल मंदिर ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ नांदूर यांनी विठ्ठल मंदिराला कुलूप लावले आहे. आजच्या आषाढी एकादशीनिमित्त लाडक्या विठ्ठलाला प्रत्यक्ष भेटता आले नाही, दर्शन घेता आले नाही, पायीवारी करता आली नाही तरी प्रत्येक वारकऱ्यांच्या मनामध्ये हा विठ्ठल पांडुरंग वसलेला आहे.   कोरोना रोगाच्या अनुषंगाने अंभोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर कुकलारे, पोलीस कॉन्स्टेबल मंजुळे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने विठ्ठल मंदिर परिसरामध्ये शुकशुकाट दिसत होता.भाविकांच्या गर्दीने ओसंडून वाहणारे रस्ते, मंदिर परिसरावर कोरोनाचे सावट पहावयास मिळाले.

      विठ्ठल मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ बलभीम विधाते यांनी सांगितले की आषाढी एकादशीला लाखो वारकऱ्यांच्या उपस्थित यात्रा भरत असते परंतु कोरोना महामारीमुळे व शासनाच्या आदेशामुळे मंदिर बंद ठेवण्यात आलेले आहे. प्रत्येक वारकऱ्यांच्या मनात आपलं जवळचं कुणी तरी हरवलय अशी दुःखद भावना मनामध्ये येत आहे. या स्वयंभू पांडुरंगाला एकच साकडे आहे लवकरात लवकर या करोना पासून सर्वांना मुक्त कर, या कोरोनातून सर्वांना वाचव.सरपंच आजिनाथ विधाते यांनी सांगितले की,पांडुरंगाच्या दर्शनाला प्रत्यक्ष शरीराने जरी जाता आले नाही तरी मनाने घरूनच पांडुरंगाचे स्मरण करून, दर्शन घेऊन आषाढी वारी करावी, या कोरोनाचा लवकरच नायनाट होवो, पांडुरंगच सर्वांचे रक्षण करणार आहे अशी देवाकडे मागणी केली.


मा.सरपंच तथा विश्वस्त संजय विधाते म्हणाले, कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे भाविकांना घरूनच पांडुरंगाचे दर्शन घेण्याची वेळ आली.दरवर्षी आषाढी एकादशीच्या यात्रेत तीन लाखापर्यंत समाज याठिकाणी जमतो परंतु आज शुकशुकाट आहे याचे दुःख वाटते. विठ्ठल मंदिर ट्रस्टचे विश्वस्तअमृत खिळदकर म्हणाले की घरी राहूनच भगवंत पांडुरंगाचे चिंतन करावे.पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो हे कोरोनाचे संकट लवकरच दूर होवो. प्रत्येक भक्ताला तुझ्या चरणाचा स्पर्श मिळो हीच प्रार्थना.

  याप्रसंगी सरपंच आजिनाथ विधाते, ट्रस्टचे अध्यक्ष एकनाथ विधाते,मा.सरपंच तथा विश्वस्त संजय विधाते,ट्रस्टचे विश्वस्त अमृत खिळकर,प्रा.कारभारी विधाते,पप्पू गवळी,राजू विधाते सर,उद्धव राऊत सर,शिवाजी गायकवाड,कैलास गुरव,विठ्ठल मंदिर ट्रस्ट व सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत नांदूर भाविकांना मंदिर दर्शनासाठी बंद असल्याबाबत माहिती देत होते.विठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंद असल्याने अनेक भाविकांनी नाराजी व्यक्त केली.भाविकांचा हिरमोड झाला.





Thursday, July 8, 2021

वाहनाच्या अपघातात घोड्याचा मृत्यू ; वाहनासह चालक फरार

हा अपघात मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास झाला आहे.धडक देऊन वाहन अपघात स्थळी न थांबवता वाहनचालकाने अपघाताचा गुन्हा व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने वाहन पळवून नेले.

नगर जामखेड राज्यमार्गावर चिचोंडी पाटील येथे वाहनाच्या अपघातात घोड्याचा मृत्यू...(छाया : सोहेल मनियार)


नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावामध्ये नगर जामखेड राज्यमार्गावर वाहनाच्या धडकेने घोड्याचा मृत्यू झाला.हा अपघात दिनांक ८.७.२०२१ रोजी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास झाला.अहमदनगर वरून जामखेड कडे जाणाऱ्या MH12 KQ5786 या वाहनाने धडक दिली असे प्रथमदर्शनी दिसते कारण या वाहनाची घोड्याला धडक दिल्यानंतर याठिकाणी पडलेली नंबर प्लेट सापडली.धडक देऊन वाहन अपघात स्थळी न थांबवता वाहन चालकाने,अपघाताचा गुन्हा व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पळवून नेले. वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु वाहन वेगाने चालून जामखेड रोड कडे पसार झाली अशी माहिती नंदा गोरख साळुंखे यांनी दिली.श्रीमती नंदा गोरख साळुंखे वय ६५ या आपल्या परिवारासह गावोगावी फिरून कुराड,विळे, कोयते,शेती अवजारे बनवण्याचा व शेवटण्याचा व्यवसाय करतात.


लोणी सय्यद मीर तालुका आष्टी जिल्हा बीड येथून हे कुटुंब व्यवसायानिमित्त चिचोंडी पाटील येथे काही दिवसापूर्वी आले होते. कोरोना महामारी च्या संकटामुळे आधीच हाताला काम नाही, पोटभर खायला नाही, रोजगार नाही.धंदा नसल्याने आर्थिक नियोजन ढासळलेले त्यातच घोड्याचा मृत्यू झाल्याने आता व्यवसायासाठी गावोगावी जायचे कसे असा प्रश्न या घिसाडी व्यवसाय करणाऱ्या जमातीच्या कुटुंबावर आला.एका गरीब हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबावर उपजीविकेचे साधन असलेल्या घोड्याच्या निधनाने उपासमारीची वेळ आली आहे.



Tuesday, July 6, 2021

दवाखान्यातच डॉक्टरने घेतली फाशी



प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये डॉक्टरने गळफास घेतला आहे. घटनास्थळी सुसाइड नोट सापडली असून त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका येथील करंजी गावात ही घटना घडली. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील प्रमुख डॉ.गणेश शेळके यांनी उपकैद्रातच पंख्याच्या हुकाला फाशी घेउन आत्मह्त्या केली.घटनास्थळी सुसाइड नोट सापडली असून त्यामध्येेे प्रशासनातील अनेक जणांची नावे आहेत.अधिकाऱ्यांचेे धाबे दणाणले असून पोलीस कोणती कार्यवाही करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




Sunday, July 4, 2021

मिरजगाव येथे जुगार अड्ड्यावर कर्जत पोलिसांचा छापा ; 20 आरोपींना अटक...

 


  अहमदनगर प्रतिनिधी-:

दि 03/07/2021 रोजी 14/20 वा.चे सुमारास मिरजगाव गावचे शिवारात कडा रोडलगत रोडचे बाजुला पत्र्याचे शेडचे बाजुला ता. कर्जत जि. अहमदनगर येथे यातील आरोपी हे गोलाकार बसुन तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळतांना व खेळविताना मिळून आले. आरोपींकडून 48,020 रु रोख रक्कम व 1000 रु. किंमतीचे जुगाराचे तिरट नावाचा हार जितीचा जुगार खेळण्यासाठी लागणारे जुगाराचे साधने असा 49,020 रु. किंमतीचा मुद्देमाल सह मिळुन आल्याने तो जप्त करण्यात आला.क्लब मालक नामे स्वप्निल संभाजी कु-हाडे हा याच्यासह खालील नमूद 21 आरोपींवर पो.कॉ/ सुनिल दिलीप खैरे, ब.नं 616 नेम-कर्जत पोलीस स्टेशन यांचे फिर्यादी वरून जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(1) गोटीराम दत्तात्रय अजबे, वय 30वर्षे, रा.शिराळ ता.आष्टी जि.बीड 2) शिवाजी भिमराव धोत्रे वय 34 वर्षे, रा.शिराळ ता. आष्टी जि.बीड 3) सुनिल विष्णु इंगळे वय 48 वर्षे, रा. मिरजगाव ता.कर्जत जि.अ.नगर 4 ) अशोक नामदेव जाधव वय-33 वर्षे, रा.घुमरी ता.कर्जत जि.अ.नगर 5 ) कैलास भाउसाहेब तनपुरे वय 44 वर्षे, रा. मिरजगाव ता. कर्जत जि.अ.नगर 6) विलास | दगडु अजबे वय 43 वर्षे, रा.शिराळ ता.आष्टी जि.बीड 7) बालाजी प्रभु कुदाले वय 48 वर्षे, रा. मिरजगाव ता. कर्जत जि.अ.नगर  8) राजेंद्र हिरालाल शेळके वय 48 वर्षे, रा. लिंमगाव चोभा ता.आष्टी जि.बीड़ 9) चंद्रकांत खुशाबा चांडे वय-30 वर्षे, रा.शिराळ | ता.आष्टी जि.बीड 10) मच्छिंद्र पांडुरंग दुधावडे वय 44 वर्षे, रा.लिंमगाव चोभा ता.आष्टी जि.बीड़ 11 ) नवनाथ लक्ष्मण | लष्करे वय 32 वर्षे, रा. बहिरोबावाडी ता.कर्जत जि.अ.नगर 12) बाळु पांडुरंग पवार वय-32 वर्षे, रा.शिराळ ता.आष्टी जि.बीड 13) कचरु दगडु आजबे वय 48 वर्षे, रा.शिराळ ता.आष्टी जि.बीड 14) रेवनाथ भिमराव सरपते वय 42 वर्षे, रा.शिराळ | ता.आष्टी जि.बीड 15) महंमद युनूस शेख वय-36 वर्षे, रा. मुर्शदपुर ता.आष्टी जि.बीड 16) संभाजी शिवाजी कु-हाडे वय 49 | वर्षे, रा. मिरजगाव ता.कर्जत जि.अ.नगर 17 हनुमंत सिताराम बुधीवंत वय-33 वर्षे, रा.शिराळ ता.आष्टी जि. बीड | 18) मच्छिंद्र धोंडीबा कर्डीले वय 52 वर्षे, रा. कडा ता.आष्टी जि.बीड 19) रतन बबन नलवडे वय-57 वर्षे, रा. हिंगणे ता.आष्टी | जि.बीड 20) राजेंद्र हिरालाल घोडके वय-50 वर्षे, रा. मिरजगाव ता.कर्जत जि.अ.नगर 21) स्वप्निल संभाजी कु-हाडे रा.मिरजगाव ता. कर्जत

सदरची कारवाई मा.पोलीस अधिक्षक श्री.मनोज पाटील, अहमदनगर जिल्हा मा.अपर पोलीस अधिक्षक,श्री सौरभकुमार अग्रवाल,उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग ,श्री आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर यादव , सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, पोलीस अंमलदार पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव , सुनिल खैरे, सचिन वारे, गोवर्धन कदम, बबन दहिफळे, ईश्वर माने, गणेश काळाने यांनी केली आहे. पुढील तपास बबन दहिफळे करत आहेत.



Saturday, July 3, 2021

घरफोडीत दीड लाख लंपास


 नगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार


कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरात केतन पार्क येथून घराची लोखंडी ग्रील तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे दीड लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला.


शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे महेश सिताराम मोहारे राहणार शिवाजीनगर यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी चार तोळ्यांचे सोन्याचे दागिने व 80 हजार रुपये रोख असा एक लाख 60 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.



Friday, July 2, 2021

रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी आ. बबनराव पाचपुते यांच्याकडून 10 लक्ष रुपयांचा निधी मंजूर


रस्ता कॉंक्रिटीकरणासाठी दहा लक्ष रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल आ.बबनराव पाचपुते यांचे आभार मानताना मा.सभापती प्रवीण कोकाटे... (छाया:सोहेल मनियार)

चिचोंडी पाटील (प्रतिनिधी): सोहेल मनियार

नगर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव पाचपुते यांनी चिचोंडी पाटील येथील पशु वैद्यकीय दवाखाना ते बेकरी पर्यंत तसेच जामा मस्जिद ते दायरा मस्जिद पर्यंतचा रस्ता कॉंक्रीटिकरणासाठी 10 लक्ष निधी मंजुर केला आहे. दहा लक्ष रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल माजी मंत्री तथा नगर श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री.बबनराव (दादा) पाचपुते यांचे चिचोंडी पाटील ग्रामस्थांनी आभार मानले.

या कामासाठी नगर तालुका पंचायत समिती मा.सभापती इंजि. प्रविणदादा पांडुरंग कोकाटे यांनी आमदार बबनदादा पाचपुते यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता

पशुवैद्यकीय दवाखाना ते विक्रीपर्यंत परिसर तसेच जामा मजीत ते दयारामजी पर्यंतच्या रस्त्यावर पावसाचे पाणी साचून येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना रस्त्याचा खूप त्रास होत होता.परंतु आता या रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लागला असल्यामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.



छत्रपती खासदार संभाजी महाराज यांची मराठा आरक्षणासंबंधी धावती भेट

चिचोंडी पाटील (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

छत्रपती खासदार संभाजी महाराज यांची मराठा आरक्षणासंबंधी चिचोंडी पाटील ता. नगर येथे धावती भेट.

 चिचोंडी पाटील ग्रामस्थांनी छत्रपती संभाजी महाराजांचे स्वागत केले.

मराठा आरक्षणा संबंधी जामखेड येथे जात असताना चिचोंडी पाटील येथील धावती भेट दिली याप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Thursday, July 1, 2021

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन ; परिचर महिलांना कोविड काळातील प्रोत्साहन भत्ता व किमान वेतन वाढ (मानधन) व निवृत्ती पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

                                                                               अहमदनगर (प्रतिनिधी) - सोहेल मनियार


प्रशासनातील आजवरचा सर्वात दुर्लक्षित आणि वंचित घटक म्हणजे अर्धवेळ स्त्री परिचारिका या कोरोना काळाच्या  महामारीत,सरकारी आरोग्य यंत्रणेच्या खांद्याला खांदा देऊन काम करणारी आरोग्य विभागात साफसफाई तसेच पडेल ती कामे करणारी हक्काची बाई म्हणजे अर्धवेळ परिचारिका होय.केवळ नावाने अर्धवेळ असणारी ही परिचारिका सुमारे 7 ते 8 तास रोज काम करते परंतु तिचा पगार हा मागील तीस वर्षांपूर्वी 50 रुपये महिना ते आज मात्र 3 हजार रुपये महिना   एवढाच वाढलेला आहे त्यामध्ये केंद्र सरकारच्या वतीने 100 रुपये आणि राज्य सरकारच्या वतीने,2900/-- रुपये असे मानधन मिळते.


या महागाईच्या काळात 100 रुपये रोजाने कुणी काम करणार दुसरं मिळणार नाही.परंतु आज ना उद्या या मायबाप सरकारला जाग येईल आणि आपला उद्धार होईल या धोरणाने ते आजपर्यंत रात्रंदिवस राब-राब,राबत,आहेत.  कुठल्याही मोठ्या इमारतीच्या पायाचा प्रत्येक दगड जसा महत्वाचा असतो,त्याचप्रमाणे अर्धवेळ परिचारिका या शासकीय आरोग्य यंत्रणेत काम करत आहेत.त्यांची आजची अवस्था ही आई जेवू घालीना, आणि बाप भीक मागू देईना अशी झालेली आहे सदर प्रमुख मागण्या सिंदखेड राजा,(जिल्हा बुलढाणा) येथील PTL पदावर काम करत असताना सर्प दौंशाने मृत पावलेल्या गीता बुरकुल यांच्या मुलास शासनाने भरगोस मदत करावी तसेच मागील वर्षीच्या कोरोना काळात देखील अनेक परिचर महिलांना प्रोत्साहन भत्ता,अद्याप ही मिळालेला नाही.आणि आजही त्या,या कोरोना महामारीच्या  काळात आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत या परिचर महिलांना यावर्षीचा तसेच मागील वर्षीचाही, प्रोत्साहन भत्ता  देण्याची उपाययोजना करावी  तसेच,आपण किमान वेतनानूसार त्यांना लवकरात लवकर पगारवाढ करावी व यापुढील सर्व वेतन (मानधन)हे त्यांना ऑनलाइन पध्दतीने देण्याची व्यवस्था करावी व हे सर्व आपल्या कडून होत नसल्यास निदान आमचे प्रश्न मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्री ,यांचे कडे तातडीने मांडावेत अशी मागणी जनआधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र शिरसागर यांना निवेदन देऊन करण्यात आली.

यावेळी जनआधार सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत राज्य सचिव अमित गांधी, जिल्हा सचिव बाळासाहेब केदारे, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य दीपक गुगळे, संतोष उदमले, कल्पनाताई महाडिक, सुरेखा जाधव, कुमुदिनी वंजारे, शहेजान शेख, लता कांबळे, उषा केदारे, प्रतिभा सोनवणे, नंदा शिंदे, योगेश सोनवणे, किरण जावळे, उमेश करपे आदीसह परिचारिक महिला उपस्थित होते.                  

मागणी मान्य न झाल्यास जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने येणाऱ्या 5 जुलैला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांचे कार्यालयात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.