Sunday, May 30, 2021

प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली धोरणात सुधारणा करा

 अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाने ग्रामविकास मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून केली मागणी

प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत बदली धोरणात सुधारणा करण्याची मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे करताना अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी..(छाया : सोहेल मनियार

अहमदनगर : (प्रतिनिधी)

महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा .हसनजी मुश्रीफ यांची अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने तालुका श्रीगोंदा येथे भेट घेवून प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांचे निवेदन दिले. यावेळी प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हातंर्गत बदली धोरणात सुधारणा करुन शुद्धिपत्रक निर्गमित करण्याची मागणी संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे व राज्य संघटक राजेंद्र निमसे यांनी केली.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या  निवेदनानुसार प्राथमिक शिक्षका़ंच्या आंतरजिल्हा व जिल्हातंर्गत बदलीविषयी ग्रामविकासमंत्री यांना दिलेले शिफारस पत्र यावेळी सादर करण्यात आले.

   आंतरजिल्हा बदली टप्पा ५ तात्काळ राबवणे व १०% अट  वगळून बदल्यांची कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली . तसेच जिल्हातंर्गत बदलीसाठी  ३वर्षाच्या सेवेनंतर विनंती बदलीचा अधिकार मिळावा, रँडम /विस्थापित शिक्षकांना ३० जून दिनांकावर बदलीची संधी देण्यात यावी.मागील शासन निर्णयानुसार अवघड क्षेत्रात काम केलेल्या शिक्षकांना संवर्ग ३चा लाभ मिळावा. प्रतिकूल क्षेत्रात काम करणाऱ्या महिलां शिक्षिकांना  बदलीचा अधिकार कायम ठेवावा.सध्या ३० कि.मी च्या आत असणाऱ्या पतीपत्नी ला वन युनीट चा लाभ मिळावा या प्रमुख मागण्याचा समावेश आहे.

 ग्रामविकास मंत्री महोदयांनी निवेदनाचा स्वीकार करुन  बदली साँफ्टवेअर विकसित झाल्यानंतर लगेचच आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबवण्याचे आश्वासन दिले तसेच जिल्हातंर्गत बदलीसंबधी शुद्धिपत्रक काढण्यासंबधी प्रशासनाशी चर्चा करुन निर्णय घेवू असे अभिवचन शिष्टमंडळास दिले. त्याचप्रमाणे प्राथमिक शिक्षकांचे वेतन हे दर महिन्याच्या एक तारखेला होण्यासाठी  शालार्थ वेतन प्रणाली ऐवजी सीएमपी प्रणाली द्वारे वेतन अदा करणेसंबंधी अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना योग्य ते निर्देश देणे संबंधी विनंती करण्यात आली आहे .

संघाच्या शिष्टमंडळात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे , राज्य संघटक राजेंद्र निमसे, जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पटेकर आदि उपस्थित होते अशी माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे यांनी दिली.

पत्रकार सोहेल मनियार 9284856967

Saturday, May 29, 2021

गोसावीवाडी येथे कोव्हीड-19 लसीकरण कॅम्पचे आयोजन ; सरपंच दत्ता घाडगे यांच्या हस्ते लसीकरणाचे उद्घाटन


गोसावीवाडी ता.श्रीगोंदा येथे कोव्हीड लसीकरणाचे उद्घाटन करताना सरपंच दत्ता घाडगे,ग्रा.पं.सदस्य विठ्ठल कुसेकर मेजर,मा.ग्रा.पं.सदस्य नंदूकाका दरेकर,शिक्षकवर्ग,आरोग्य कर्मचारी,आदी..( सोहेल मनियार,अहमदनगर )

अहमदनगर (प्रतिनिधी)

श्रीगोंदा तालुक्यातील महांडूळवाडी ग्रामपंचायत अंतर्गत,गोसावी वाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये, कोव्हीड १९ लसीकरण मोहिमेअंतर्गत ४५ वर्ष वयोगटाच्या वरील नागरिकांचे लसीकरण ग्रामपंचायत महांडूळ वाडीचे,प्रथम लोकनियुक्त सरपंच दत्ता घाडगे यांच्या नियोजनातून करण्यात आले.कोरोना लसीकरण कॅम्प व कोरोना रॅपिड अँटीजेन चाचणीचे उद्घाटन प्रथम लोकनियुक्त सरपंच दत्ताजी घाडगे यांच्या हस्ते व प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवगण चे वैद्यकीय अधिकारी प्रकाश कांबळे,डॉक्टर सुरोसे, डॉक्टर बडे, आरोग्य पर्यवेक्षक झांबरे, आरोग्य कर्मचारी नेटके बी.बी. ग्रा.पं.सदस्य विठ्ठल कुसेकर मेजर,मा.ग्रा.पं.सदस्य नंदूकाका दरेकर,प्रतिक लष्करे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.१३० नागरिकांचे लसीकरण या वेळी करण्यात आले.

याप्रसंगी सेंट्रल बँक ऑफ इंडिया मांडवगणचे शाखाधिकारी अतुल करवाडे, ग्रामसेवक देवतरसे भाऊसाहेब,विठ्ठलराव महांडुळे,प्रतिक लष्करे, ठोंबरे, भस्मेआदींची उपस्थिती होती.

ग्रामपंचायत मांडूळवाडी गोसावीवाडी या ठिकाणी कोरोनाविषाणू चा उद्रेक वाढू लागल्याने लसीकरण कॅम्प घेण्यात आला. सरपंच दत्ता घाडगे हे नेहमीच समाजाला आधार देण्याचे काम करत असतात आजच्या या सामाजिक कार्याबद्दल ग्रामस्थ, कोरोना रुग्ण, नातेवाईक आणि दत्ता घाडगे मित्र मंडळ यांनी सरपंच दत्ता घाडगे यांचे विशेष कौतुक करत समाधान व्यक्त केले आहे.कोरोना संकटकाळात आपणही काहीतरी समाजाच्या कामी यावे म्हणून आज विविध उपक्रम महांडूळवाडी ग्रामपंचायत राबवत आहे.महांडूळवाडी ग्रामपंचायत चे सर्व सदस्य, सरपंच,उपसरपंच यांनी राबवलेल्या या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले जात आहे. कोव्हिड लसीकरणाचा कॅम्प यशस्वी होण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवगण चे आरोग्य कर्मचारी,सिस्टर हराळ एस.आर., सिस्टर इंगळे एल.बी., परिचारिका वाडगे डी. बी., आरोग्य कर्मचारी नेटके बी.बी.,जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शेख समीर, मनियार सर, रायकर सर,पवार सर,अंगणवाडी सेविका यादव एस. बी.,चव्हाण एम.आर., शितल भस्मे,आशा सेविका घालमे सी.बी., महांडूळवाडी ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक,कर्मचारी, ग्रामस्थ, स्वयंसेवक आदींनी विशेष परिश्रम घेतले.

महांडूळवाडी ग्रामपंचायत चे लोकनियुक्त सरपंच दत्ता घाडगे नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.

( पत्रकार सोहेल मनियार 9284856967 )

ऊसगाळपात जिल्ह्यातील चार कारखाने अव्वल


राज्यातील साखर उत्पादनातही पहिल्या दहा मध्ये जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा समावेश


लोकमन महाराष्ट्र न्यूज 

राज्यात उच्चतम ऊस गाळप करणाऱ्या दहा साखर कारखान्यांमध्ये नगर जिल्ह्यातील चार कारखाने अव्वल ठरले असून, उच्चतम साखर उत्पादन करण्यातही जिल्ह्यातील दोन कारखान्यांनी बाजी मारली आहे. तर दुसरीकडे कमी साखर उतारा असलेल्या राज्यातील दहा साखर कारखान्यांमध्ये जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा समावेश आहे. शिवाय उच्चतम ऊसदर दिलेल्या दहा कारखान्यांमध्ये जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याचा समावेश नाही.

पुणे येथील साखर आयुक्तालयाने गाळप हंगाम 2020- 21 मधील राज्यातील 21 जिल्ह्यांमधील साखर कारखान्यांचा तपशील जाहीर केला आहे. जिल्हानिहाय ऊसगाळप तपशिलानुसार या हंगामात अहमदनगर जिल्ह्यातील 22 सहकारी व खाजगी साखर कारखान्यांनी एकूण १ कोटी ५५ लाख १५ हजार ७५ मेट्रिक टन उसाचे गाळप केले.त्यातून जिल्ह्यात एकूण १ कोटी ५२ लाख १२ हजार ३०३ मेट्रिक टन साखरेची निर्मिती झाली आहे. सरासरी १६६ दिवस गाळप चालले असून,सरासरी साखर उतारा ९.८० टक्के इतका आहे.

उच्चतम ऊस गाळप केलेल्या राज्यातील १० कारखान्यांमध्ये नगर जिल्ह्यातील चार कारखान्यांचा समावेश आहे.यात कर्जत तालुक्यातील अंबिका नगर येथील इंडिकाँन डेव्हलपर्स प्रा.लि. श्री अंबिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कारखान्याने १८.८८ मेट्रिक टन,भेंडा बु. ता. नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने १४.५० मेट्रिक टन,सोनई ता.नेवासा येथील मुळा सहकारी साखर कारखान्याने १२.५८ मेट्रीक टन,बाभूळगाव ता. शेवगाव येथील गंगामाई इंडस्ट्रीज अँड कंस्ट्रक्शन लि. या खाजगी कारखान्याने १२.५५ मेट्रिक टन ऊस गाळप केले आहे.

उच्चतम साखर उत्पादन केलेल्या राज्यातील दहा जिल्ह्यात नगर जिल्ह्यातील दोन कारखान्यांचा समावेश आहे. त्यामध्ये कर्जत तालुक्यातील अंबिका नगर येथील इंडिकाँन डेव्हलपर्स प्रा. लि. श्री अंबिका शुगर प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी कारखान्याने १७ लाख १ हजार ५०० क्विंटल, तर भेंडा बु. तालुका नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने १५ लाख ६० हजार ३०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.तर दुसरीकडे कमी साखर उतारा असलेल्या राज्यातील दहा जिल्ह्यांमध्ये नगर जिल्ह्यातील वाळकी ता.नगर येथील पियुष शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड हा खाजगी (साखर उतारा ७.५५ टक्के) तर प्रवरानगर ता.राहता पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना (साखर उतारा सात पॉईंट ७.७९ टक्के ) या दोन कारखान्यांचा समावेश आहे.


उच्चतम उताऱ्यात एकही कारखाना नाही


राज्यात उच्चतम उतारा असलेल्या दहा कारखान्यांमध्ये कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील कारखान्यांचा समावेश आहे .यामध्ये नगर जिल्ह्यातील एकही कारखाना नाही. सर्वात कमी ऊस गाळप साखर उत्पादन यामध्येही जिल्ह्यातील एकही कारखाना नाही . मात्र उच्चतम ऊसदर दिलेल्या कारखान्यात जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील अंबिकानगर येथील इंडीकाँन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड श्री.अंबिका शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याचा समावेश आहे.


सोहेल मनियार पत्रकार 9284856967

नगरमध्ये पेट्रोल शंभरी पार

लोकमन महाराष्ट्र न्यूज

पेट्रोल-डिझेलच्या दरात आज मोठी वाढ झाली आहे.आज अहमदनगर मध्ये पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली. आज पेट्रोलचा प्रति लिटर दर १०० रुपये १६ पैसे आहे.डिझेल चा प्रति लिटर दर ९० रुपये ५० पैसे नोंदवला गेला. दोन दिवसानंतर पेट्रोल प्रतिलिटरमागे २५ पैसे आणि डिझेल प्रतिलिटर मागे २९ पैसे भाव वाढ झाली .

Friday, May 28, 2021

निर्बंध होणार शिथिल ;लॉकडाऊन सुरूच राहणार

नवी नियमावली लवकरच
मुंबई (प्रतिनिधी)
जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात १ जून नंतर लॉकडाऊन सुरूच राहील.पण निर्बंध टप्प्याटप्प्याने उठविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या गुरुवारच्या बैठकीत घेण्यात आला.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाची चर्चा करतील, त्यानंतर एक-दोन दिवसात नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार आहेत.प्रत्येक जिल्हानिहाय निर्बंध वेगवेगळे असतील असे सूत्रांनी सांगितले.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुतेक मंत्र्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन कायम ठेवावा.पण निर्बंध शिथिल करावे अशी भूमिका मांडली.
राज्याचे अर्थचक्र सुरू ठेवायचे असेल तर कडक  लॉक डाऊन परवडणार नाही निर्बंधांमुळे व्यापारावर विपरीत परिणाम झाला असून लोक आता लॉक डाऊन नको असे म्हणत आहेत. व्यापारीवर्गचाही मोठा दबाव आहे त्यामुळे कडक लॉक डाऊन बाबत फेरविचार करण्याची विनंती मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली.
निर्बंध कमी कसे करता येतील या संदर्भात मार्गदर्शक सूचना तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनी पत्रकारांना सांगितले की निर्बंध शिथिल केले जातील पण लॉक डाऊन सरसकट उठविला जाणार नाही.

सकाळी सात ते दुपारी एक 

सर्व प्रकारची दुकाने सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली जाईल सुरुवातीला धार्मिक,सांस्कृतिक,सामाजिक कार्यक्रमावर बंदी घातलेली कायम राहील.
रेस्टॉरंट बंद राहतील पण पूर्वीप्रमाणे होम डिलिव्हरी सुरू असेल. सिनेमागृहे,नाट्यगृहे बंद असतील.
मुंबईत सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाची अनुमती नसेल.

प्रमुख शहरात कोरोणाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आला असला तरी सिंधुदुर्ग,नंदुरबार, बीड, परभणी ,हिंगोली,वर्धा, वाशिम,चंद्रपूर, नांदेड,अमरावती, यवतमाळ व गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण अधिक आहे

१५ जिल्हे रेड झोनमध्ये

बुलढाणा,अकोला, वाशिम, यवतमाळ ,अमरावती ,गडचिरोली, अहमदनगर ,कोल्हापूर ,सांगली सातारा,सोलापूर, रत्नागिरी सिंधुदुर्ग, बीड ,उस्मानाबाद हे पंधरा जिल्हे कोरोनाच्या दृष्टीने रेड झोन मध्ये आहेत त्यांच्याबाबत निर्बंध स्वरूप वेगळे राहील अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

सोहेल मनियार पत्रकार 9284856967

Thursday, May 27, 2021

भातोडीत जनता कर्फ्यू, गाव बंदचा स्वयंस्फूर्तीने निर्णय

चिचोंडी पाटील (प्रतिनिधी )- सोहेल मनियार

 नगर तालुक्यातील ऐतिहासिक भातोडी गावांमध्ये कोरोना ग्राम सुरक्षा समिती व भातोडी ग्रामस्थ यांच्या निर्णयान्वये भातोडी मध्ये गावात जनता कर्फ्यू लागू करून गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोना रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा अनुषंगाने कोरोना ग्राम सुरक्षा समितीने,जनता कर्फ्यू मध्ये भातोडी गावामध्ये निर्बंध लागू केले आहेत.

भातोडी येथील सर्व ग्रामस्थांना व परिसरातील नागरिकांना याद्वारे कळविण्यात येतेकी गावातील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येमुळे भातोडी गावात शुक्रवार दि.२८ मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून ते मंगळवार दिनांक १ जून २०२१ सकाळी ७ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय ग्रामस्थांनी व कोरोना सुरक्षा समिती यांनी स्वयंस्फूर्तीने घेतला आहे या काळात संपूर्ण गाव शंभर टक्के बंद राहणार आहे जर या कालावधीत कोणतेही नागरीक विना मास्क  अथवा योग्य कारण नसताना फिरताना दिसल्यास किंवा कोणतेही दुकान, हॉटेल उघडले दिसल्यास दंडात्मक कार्यवाही होणार आहे. सर्व ग्रामस्थांनी याची नोंद घ्यावी. आपल्या गावची काळजी आपण घेतल्यास निश्चितच कोरोना पॉझिटिव्ह संख्या गावातील कमी होऊन, महामारी कमी होईल यासाठी शासकीय नियमाचे पालन करून शंभर टक्के गाव बंद ठेवून सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे,असे आवाहन कोरोना ग्राम सुरक्षा समिती भातोडी तालुका जिल्हा अहमदनगर यांनी केले आहे.

 सोहेल मनियार पत्रकार 9284856967

Tuesday, May 25, 2021

विदयार्थ्यांच्या राज्यस्तरीय "स्वाध्याय" उपक्रमास स्थगिती ; अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या मागणीला यश -राजेंद्र निमसे


अहमदनगर : (सोहेल मनियार)

महाराष्ट्र राज्य  शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून इयत्ता १ते ९ वी साठी १५ मे २०२१पासून राबवण्यात येणा-या विद्यार्थ्याच्या स्वाध्याय उपक्रमास स्थगिती देण्यात आली आहे. या निर्णयाची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे, राज्यसरचिटणीस कल्याण लवांडे व राज्यसंघटक राजेंद्र निमसे  यांनी दिली .

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने १४ मे २०२१रोजी विद्या प्राधिकरण, पुणे यांना निवेदन देवून गेली वर्षभर विद्यार्थ्यांनी कोविड १९च्या या कठीण परिस्थितीत आँफलाइन व आँनलाइन अध्ययन केले आहे व उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांना बौध्दिक विश्रांतीची गरज असून शिक्षकही सध्या कोरोना संबधी विविध कामे करत आहेत . या अतिरिक्त कामाचा ताण शिक्षकांवर पडणार असल्याचे म्हटले होते.तसेच घराघरात अनेक रुग्ण असतांना या भयग्रस्त वातावरणात कोणतंही शैक्षणिक वातावरण नसतांना हा उपक्रम उन्हाळी सुट्टीत राबवण्याचा अट्टाहास का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.

शाळा सुरु झाल्यानंतर या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी व सर्व विद्यार्थ्यांना छापील स्वाध्याय पुस्तिका उपलब्ध करुन देण्याची मागणी संघटनेमार्फत करण्यात आली होती.

एकुण सध्याची परिस्थिती पाहून व स्वाध्याय उपक्रमास मिळणारा कमी प्रतिसाद लक्षात घेवून महाराष्ट्र राज्य  शैक्षणिक संशोधन व परिषद पुणे यांचे कडून उपक्रम सध्या स्थगित करण्यात येत असल्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
या निर्णयाचे स्वागतअखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे  राज्याध्यक्ष देविदास बस्वदे, राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे ,राज्य उपाध्यक्ष सुनील जाधव, राज्य संघटक राजेंद्र निमसे आदींसह शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष शरद वाढेंकर, जिल्हा कोषाध्यक्ष संजय शेळके, ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद आव्हाड, जिल्हा सरचिटणीस सुरेश नवले, जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू चौधरी, जिल्हा कोषाध्यक्ष दत्तात्रय परहर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संदीप भालेराव, पदवीधर जिल्हाध्यक्ष रज्जाक सय्यद, सांस्कृतिक संघाचे जिल्हाध्यक्ष सुधीर शेळके,जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी  ढाकणे, ज्ञानदेव उगले , मधुकर डहाळे,सुधीर रणदिवे ,विलास लवांडे, ज्ञानदेव कराड, प्रकाश पटेकर,बापूराव वावगे, मधुकर डहाळे,संजय सोनवणे, नंदू गायकवाड, दत्तात्रय बर्गे, रामराव ढाकणे,राजकुमार शहाणे,पांडुरंग देवकर ,प्रवीण शेळके, अशोक दहिफळे, राहुल व्यवहारे, आदिनाथ पोटे, राजेंद्र गांगर्डे, विनायक गोरे, जनार्दन काळे , बाळासाहेब जाधव ,रवींद्र अनाप, शिवाजी नरवडे, शहाजी जरे , संदीप कडू, प्रकाश कदम, सुखदेव डेंगळे, दिलीप दहिफळे, संभाजी तुपेरे, शिवाजी माने, नवीनकुमार वागजकर, राजेंद्र सुतार, भारत शिरसाठ, अनिल शिरसाठ,लक्ष्मण चेमटे, संतोष ठाणगे, संजय सोनवणे, सुनिल कदम,बथुवेल हिवाळे, दिपक सरोदे, सुधीर बोऱ्हाडे, राजेंद्र देशमुख,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष दिपाली बोलके,जिल्हा सरचिटणीस संगीता घोडके ,बँकेच्या माजी संचालिका संगीता निमसे, जिल्हा उपाध्यक्ष  उज्वला घोरपडे, मनीषा क्षेत्रे ,संगीता निगळे, सुरेखा बळीद, मनिषा गोसावी, अनिता उदबत्ते,सविता नागरे, वर्षा शिरसाठ,वसुंधरा जगताप आदी पदाधिकारी यांनी आभार व्यक्त केले. अशी माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे यांनी दिली.

(सोहेल मनियार पत्रकार 9284856967)

जि.प.सदस्य तथा उपजिल्हाप्रमुख यांनी रुग्णवाहिका स्वतः चालवत आरोग्य केंद्रास पोहोच केली.

 



टाकळी काझी ता.नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांच्या विशेष प्रयत्नातून रुग्णवाहिका देण्यात आली. त्यांनी ती स्वतः चालवत पोहोच केली.
( छाया सोहेल मनियार,चिचोंडी पाटील )

नगर तालुक्यातील टाकळी काझी प्राथमिक आरोग्य केंद्राला,शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांच्या विशेष प्रयत्नातून ॲम्बुलन्स देण्यात आली आणि ही रुग्णवाहिका स्वतः संदेश कार्ले यांनी चालवत टाकळी काझी प्राथमिक आरोग्य केंद्राला पोहोच केली.जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले यांनी विशेष प्रयत्न करून ही रुग्णवाहिका टाकळी काझी प्राथमिक आरोग्य केंद्रास दिल्याने, या रुग्णवाहिकेचा लाभ, रुग्णांना निश्चितच  मोठ्या प्रमाणात होणार आहे. नगर जामखेड राज्यमार्गावरीलटाकळी काझी प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिकेची अडचण दूर झाली आहे. लोकांच्या अडचणी दूर करून सर्वसामान्य गोरगरीब जनता व शेतकऱ्यांचा नेता म्हणून आपली ओळख संदेश कार्ले यांनी निर्माण केली आहे. खूप दिवसापासून रुग्णवाहिकेची असलेली अडचण दूर होऊन,रुग्णवाहिकेची मागणी पूर्ण केल्याबद्दल टाकळी काझी व परिसरातील तसेच नगर तालुक्यातील ग्रामस्थांनी संदेश कार्ले यांचे याबद्दल अभिनंदन केले आहे. तसेच संदेश कार्ले यांनी रुग्णवाहिका स्वतः चालवत प्राथमिक आरोग्य केंद्रा पर्यंत पोहोचत केल्याने तो कौतुकाचा विषय ठरला आहे.

( सोहेल मनियार पत्रकार 9284856967 )



Saturday, May 22, 2021

बॉस्को ग्रामीण विकास केंद्र अंतर्गत पारेवाडी येथे स्टीमरचे वाटप



बॉस्को ग्रामीण विकास केंद्र अंतर्गत पारेवाडी व पारगाव येथे स्टीमरचे वाटप करताना फा.जॉर्ज डिआबिओ,सभापती संदीप गुंड, गटविकास अधिकारी सचिन घाडगे आदी ... (छाया:सोहेल मनियार)

बॉस्को ग्रामीण विकास केंद्र अंतर्गत जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नगर तालुक्यातील पारेवाडी येथे वाफ घेण्यासाठी मशीन (स्टीमर) चे वाटप करण्यात आले.

दिवसेंदिवस ग्रामीण भागात कोरोणाचा शिरकाव वाढत चालला आहे.गावोगावी कोरोना चे रुग्ण वाढत आहेत.यामुळे पारेवाडी  व पारगाव येथे वाफ घेण्याच्या मशीन (स्टीमर) चे वाटप करत आहोत अशी माहिती बास्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फा.जॉर्ज डिआबिओ, उपसंचालक फा.नेल्सन मुडलियार यांनी दिली.पारगाव येथे सभापती संदीप गुंड यांच्या सहकार्यातून स्टीमर चे वाटप केले.पारगाव ग्रामस्थांकडून या उपक्रमाचेकौतुक होत आहे. तसेच आत्तापर्यंत रांजणी, माथनी,आगडगाव, बाळेवाडी आदी ठिकाणी प्रत्येक कुटुंबाला एक स्टीमर देण्याचा उपक्रम केला आहे. आत्तापर्यंत दीड हजार स्टीमर चे वाटप केले आहे.अजून ४ हजार स्टीमर बास्को ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून वाटणार आहोत.यासाठी सभापती संदीप गुंड यांचे मोलाचे योगदान,सहकार्य मिळत आहे.असे फा.जॉर्ज डिआबिओ यांनी सांगितले.
याप्रसंगी नगर तालुका पंचायत समितीचे सभापती संदीप गुंड, गटविकास अधिकारी सचिन घाडगे,ग्रामसेवक मनीष लोखंडे, प्रसाद पवार,जालिंदर शिंदे, ग्रामपंचायत सदस्य तानाजी गुंड, सचिन शिंदे,ग्रामपंचायत सदस्य अशोक कांडेकर,गायकवाड, नितीन शिंदे,पारगाव ग्रामपंचायत सदस्य गणेश गुंड,विक्रम शिंदे, दत्ता शिंदे,बबन वैराळ,दिलीप गुंड,युवा सेना तालुका उपाध्यक्ष वैभव शिंदे,बबन शिंदे सर, जयदीप गुंड,भाऊसाहेब शिंदे, दत्तात्रय तनपुरे,दिलीप शिंदे व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.कोरोना महामारीत सर्वसामान्य लोकांसाठी बॉस्को ग्रामीण विकास केंद्र व सभापती संदीप गुंड करत असलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.


सोहेल मनियार पत्रकार 9284856967

Sunday, May 16, 2021

बास्को ग्रामीण विकास केंद्र अंतर्गत स्टीमरचे वाटप

बॉस्को ग्रामीण विकास केंद्र अंतर्गत बाळेवाडी (ता.नगर) येथे स्टीमरचे वाटप करताना संचालक फा.जॉर्ज डिआबिओ, सभापती संदीप गुंड, सरपंच मंज्याबापू घोरपडे आदी ... (छाया:सोहेल मनियार)

बॉस्को ग्रामीण विकास केंद्र अंतर्गत जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी नगर तालुक्यातील बाळेवाडी येथे वाफ घेण्यासाठी मशीन (स्टीमर) चे वाटप करण्यात आले.

दिवसेंदिवस ग्रामीण भागात कोरोणाचा शिरकाव वाढत चालला आहे.गावोगावी कोरोना चे रुग्ण वाढत आहेत.यामुळे बाळेवाडी येथे वाफ घेण्याच्या मशीन (स्टीमर) चे वाटप करत आहोत अशी माहिती बास्को ग्रामीण विकास केंद्राचे संचालक फा.जॉर्ज डिआबिओ, उपसंचालक फा.नेल्सन मुडलियार यांनी दिली.तसेच आत्तापर्यंत रांजणी, माथनी,आगडगाव येथे प्रत्येक कुटुंबाला एक स्टीमर देण्याचा उपक्रम केला आहे.अजून ४ हजार स्टीमर बास्को ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून वाटणार आहोत.यासाठी सभापती संदीप गुंड यांचे मोलाचे योगदान,सहकार्य मिळत आहे.असे फा.जॉर्ज डिआबिओ यांनी सांगितले.बाळेवाडी गावात जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आली.
याप्रसंगी पंचायत समिती नगरचे सभापती संदीप गुंड,सरपंच मंज्याबापू घोरपडे,माजी सरपंच हरी पालवे,अनिल पालवे,पप्पू घुले,गणेश सानप,रामदास पालवे,अशोक कांडेकर, सर्जेराव ढोबे, नितीन पालवे आदी उपस्थित होते.





Saturday, May 15, 2021

शंभूराजे जयंती चिचोंडी पाटील येथे उत्साहात साजरी ; शंभूराजे प्रतिष्ठानच्या वतीने कोव्हीड रुग्णांना बिस्कीट वाटप



ग्रामपंचायत कार्यालय चिचोंडी पाटील येथील शंभूराजे जयंती साजरी करताना शंभुराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता वाडेकर, शिवाजी सुंबे आदी... (छाया : सोहेल मनियार)

नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथे ग्रामपंचायत कार्यालयात शंभुराजे प्रतिष्ठान चे अध्यक्ष दत्ता भाऊ वाडेकर, शिवाजी सुंबे यांच्या हस्ते शंभूराजे जयंती साजरी करण्यात आली. एकाच दिवशी शंभूराजे जयंती, रमजान ईद,अक्षय तृतीया,
बसवेश्वर महाराज जयंती एकाच दिवशी आल्याने ग्रामस्थांनी लॉकडाउनच्या नियमांचे पालन करून सामाजिक अंतर राखून मास्क व सॅनिटायझरचा वापर करून जयंती साजरी करण्यात आली.शंभूराजे यांचे चरित्र व महती सांगितली.सर्वांनी अक्षय तृतीया,शंभुराजे जयंती,रमजान ईद,बसवेश्वर महाराज जयंती च्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण कोकाटे,सरपंच मनोज कोकाटे,माजी उपसरपंच शरद पवार,शंभुराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ता भाऊ वाडेकर, शिवाजी सुंबे सर,सचिन ठोंबरे, विद्यासागर कोकाटे,प्रशांत कांबळे,अनिकेत जगताप, सुखदेव कोकाटे आदी उपस्थित होते.




Thursday, May 13, 2021

आम्ही शिक्षक नगरकर ग्रुपच्या वतीने शाळेला ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन भेट



आम्ही शिक्षक नगरकर ग्रुपच्या वतीने जि.प.प्राथ.शाळा चिचोंडी पाटील येथे ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन भेट देताना गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत सोनार,माजी सभापती प्रवीण कोकाटे आदी.. (छाया : सोहेल मनियार)



नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आम्ही शिक्षक 
नगरकर ग्रुपच्या वतीने ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन व ५ ड्रम सॅनिटायझर 
पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत सोनार,माजी सभापती प्रवीण कोकाटे
 यांच्या हस्ते देण्यात आले.
जि.प.प्राथ.शाळा चिचोंडी पाटील येथे कोव्हिड रुग्णांसाठी विलगीकरणाची व्यवस्था केली आहे. 
त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी याठिकाणी ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन
 व ५ ड्रम सॅनिटायझर दिले असून आता सेन्सॉर मुळे हाताचा स्पर्श न करता सॅनिटायझर मिळेल
 तसेच आम्ही शिक्षक नगरकर ग्रुपच्या वतीने आत्तापर्यंत नगर तालुक्यात २ लक्ष रुपयांची मदत
 केली आहे.त्यामध्ये औषधे , ऑटोमॅटिक सॅनिटायझर मशीन, मास्क,सॅनिटायझर आदी
 स्वरूपात मदत केली आहे. अशी माहिती पंचायत समिती नगरचे गटशिक्षाधिकारी
 चंद्रकांत सोनार यांनी दिली.
याप्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती प्रवीण कोकाटे,जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी
 अल्पसंख्यांक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुस्तफा मनियार, मुख्याध्यापक कांबळे,
सरपंच मनोज कोकाटे,ग्रामसेवक देविदास मोरे,ग्रामपंचायत सदस्य दिपक हजारे
,पोलिस पाटील नीळकंठ खराडे, अनिल डोखडे, प्रशांत कांबळे, शिवाजी कोकाटे आदी उपस्थित होते.






 सोहेल मनियार पत्रकार 9284856967
Attachments area

Wednesday, May 12, 2021

शेततळ्यात बुडून मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना धनादेशाचे वाटप

 शेततळ्यात बुडून मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना धनादेशाचे वाटप

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील येथील न्यू इंग्लिश स्कूल येथील ऋतुजा अमोल कोकाटे, तुषार राजेंद्र पवार,संस्कृती संदीप पवार या शेततळ्यात बुडून मृत पावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी ७५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला.
जिल्हा परिषद अहमदनगर व नगर तालुका पंचायत समिती यांच्या वतीने पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत सोनार,माजी सभापती प्रवीण कोकाटे,स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष आबासाहेब कोकाटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब पवार, न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य राठोड सर यांच्या हस्ते राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजने अंतर्गत प्रत्येकी ७५ हजार रुपयांच्या धनादेशाचे विद्यार्थ्यांच्या पालकांना वाटप करण्यात आले.
गेल्यावर्षी १० जुलै २०२१ रोजी चिचोंडी पाटील गावच्या पवार पट्टा म्हणून ओळखले जाणारे शिवारात  शेततळ्यात बुडून चुलत बहीण भावाचा मृत्यू झाला होता.चिचोंडी पाटील विविध कार्यकारी सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र रघु पवार यांचा शाळेत शिकणारा तेरा वर्षांचा मुलगा तुषार राजेंद्र पवार तसेच संदीप रघु पवार उर्फ पैलवान यांची नऊ वर्षांची मुलगी संस्कृती या दोन्ही चुलत बहिण भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता.त्यापूर्वी चार महिन्यापूर्वी चिचोंडी पाटील चे माजी सरपंच अमोल कोकाटे यांच्या मुलीचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला होता. त्यामुळे राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत मृत पावलेल्या या तीन विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रत्येकी ७५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. याप्रसंगी माजी सरपंच तथा स्कूल कमिटी सदस्य दीपक चौधरी, महाराष्ट्र राज्य अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुस्तफा मनियार सर, स्कूल कमिटी सदस्य लक्ष्मण हजारे,जि.प.प्राथ. शाळेचे मुख्याध्यापक कांबळे सर,राम कोकाटे सर,प्रशांत कांबळे, दादासाहेब पाचारणे सर, सेवा सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र पवार,माजी सरपंच अमोल कोकाटे आदी उपस्थित होते



शेततळ्यात बुडून मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना धनादेशाचे वाटप करताना विस्ताराधिकारी चंद्रकांत सोनार, माजी सभापती प्रवीण कोकाटे आदी...(छाया : सोहेल मनियार)