अहमदनगर (प्रतिनिधी) - सोहेल मनियार
खते,बी-बियाणे,कीटकनाशकांची चढ्या भावाने विक्री करू नये तसेच शेतकऱ्यांना खरेदीची पक्की दिले द्यावीत अशा सूचना नगर तालुका पंचायत समिती प्रशासनाच्या वतीने कृषी सेवा केंद्रांना देण्यात आल्या आहेत.नगर तालुक्यात खरिप च्या पेरणीसाठी शेतकरीवर्ग खते,बी-बियाणे खरेदसाठी शहरांमध्ये गर्दी करू लागला आहे.दरम्यान अनेक दुकानदारांकडून शेतकऱ्यांना विनाकारण अडवणूक करणे व गरज नसणाऱ्या वस्तू विक्री करणे याबाबत तक्रारी येत होत्या या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यातील मार्केट यार्ड मधील कृषी सेवा केंद्रांची सभापती सुरेखा गुंड,उपसभापती डॉ.दिलीप पवार,तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले,विस्तार अधिकारी ढेरंगे यांनी कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली.यावेळी विक्रेत्यांकडून उपलब्ध असलेल्या खते,बियाणे,किटकनाशकांची माहिती घेण्यात आली तसेच साठा उपलब्धतेबाबत साठाभाव फलक अद्यावत करून खताचा पूर्वीचा शिल्लक साठा जुन्या दराने विक्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या शेतकऱ्यांनी बियाणे दुकाना संदर्भात तक्रार असल्यास बिलासह तक्रार करावी असे आवाहन पंचायत समिती प्रशासनातर्फे करण्यात आले आहे

No comments:
Post a Comment