Friday, June 11, 2021

नगर पंचायत समितीच्या प्रलंबित कामांना मिळणार गती


अहमदनगर (प्रतिनिधी) : सोहेल मनियार
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने आणि रुग्णसंख्या कमी झाल्याने अहमदनगर जिल्ह्यातील लॉकडाऊन उठवले आहे.त्यामुळे  नगर पंचायत समितीने कात टाकली असून तालुक्यातील प्रलंबित कामांचा तात्काळ निपटारा होणार आहे.लॉकडाऊनमुळे नागरिक व ग्रामपंचायतीचे अनेक कामे प्रलंबित होते.लॉकडाऊन हटवल्यानंतर पंचायत समितीचे सभापती सुरेखा गुंड,उपसभापती डॉ.दिलीप पवार यांनी सर्व विभाग प्रमुखांसह गटविकास अधिकारी सचिन घाडगे यांच्या समवेत बैठक घेतली.यानुसार कृषी विभाग,पशुधन विभाग,सार्वजनिक बांधकाम विभाग,ग्रामीण पाणीपुरवठा विभाग,स्वच्छता विभाग,समाज कल्याण विभाग,महिला बालकल्याण विभाग,शिक्षण विभाग,घरकुल विभाग आदी विभागातील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा केला जाणार आहे.तसेच तालुक्यातील पाणीपुरवठा योजना,अपूर्ण बांधकामे,रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.याप्रसंगी माजी सभापती रामदास भोर,पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे यांसह सर्व खाते प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.पंचायत समितीचे कामकाज अधिक गतिमान केले जाणार असून नागरिकांना अडचणी आल्यास त्यांनी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन सभापती सुरेखा गुंड,उपसभापती डॉ.दिलीप पवार यांनी केले आहे.

1 comment: