Tuesday, November 16, 2021

तब्बल दीड वर्षानंतर शाळेत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत

 

नगर तालुक्यातील भातोडी येथील जि.प.प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करताना मा.उपसरपंच राजूभाई पटेल, उपस्थित सर्व मान्यवर... (छाया:सोहेल मनियार)

चिचोंडी पाटील : (प्रतिनिधी)


कोरोना महामारी मुळे तब्बल दीड वर्षानंतर राज्यातील शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. नगर तालुक्यातील भातोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची घंटा दीड वर्षानंतर वाजली. दीड वर्षानंतर पुन्हा सुरू झालेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.शाळा पुन्हा पूर्ववत सुरू झाल्यामुळे मुले,पालक,शिक्षक सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

यावेळी मुलांचे स्वागत पुष्पगुच्छ,मास्क ,चाँकलेट देऊन शाळेच्या प्रवेशद्वार वर जंगी स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी विस्तार अधिकारी चंद्रकांत खाडे,मा.उपसरपंच राजुभाई पटेल,मा.ग्रा.प.सदस्य राजेंद्र काळे,ग्रामविकास अधिकारी लोखडे,मुख्याध्यापक नरवडे सर,मा.दातीर मॅडम, शालेय समितीचे अध्यक्ष पापामिया पटेल,मा. ग्रामपंचायत सदस्य अमोल कदम, डॉ.डमाळे, तलाठी झाबरे,जावळे मॅडम,पटेल मॅडम, कदम मॅडम,कचरे मॅडम,पंडीत मॅडम,शिंदे मॅडम,कदम मॅडम ,बनसोडे मॅडम,शिवाजी लबडे, शिंदे सर,म्हस्के सर,बोरुडे सर,जालिंदर शिंदे यांसह भातोडी ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.




No comments:

Post a Comment