लोकमन(प्रतिनिधी):-
रशियाने युक्रेनवर हल्ला करत युद्धाला सुरुवात केली आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी या हल्ल्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, युक्रेनमध्ये अजूनही हजारो भारतीय अडकले असून, अडकलेल्या भारतीयांच्या मदतीसाठी भारत सरकारने 24 तास हेल्पलाइन सुरू केली आहे.
तत्पूर्वी भारतीयांना मायदेशी परत आणण्यासाठी युक्रेनला जाणारे एअर इंडियाचे विमान दिल्लीला अर्ध्यावाटेतून माघारी परतले आहे. त्यामुळे युक्रेनमध्ये अजूनही अंदाजे 20 हजाराहून अधिक भारतीय अडकून पडले आहेत.
दरम्यान, भारताने रशिया आणि युक्रेनमधील तणाव तत्काळ कमी करण्याचे आवाहन केले असून, परिस्थिती न बदलल्यास हे संकट मोठ्या संकटात बदलू शकते असा इशारा दिला आहे.
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युक्रेनमध्ये सैन्य पाठवू नये आणि समस्या शांततेने सोडवाव्यात असे आवाहन केले आहे.
लोकमन महाराष्ट्र न्यूज
पत्रकार सोहेल मनियार
9284856967
No comments:
Post a Comment