Wednesday, August 10, 2022

राज्य सरकारचा मोठा निर्णय! अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार मिळणार

 


मुंबई  (प्रतिनिधी) : सोहेल मनियार

अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठी घोषणा केली आहे. आता पूरग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.


शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आज पहिली मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर करण्यात आली. तर दुसरा निर्णय मुंबई मेट्रो संदर्भात घेण्यात आला.


दरम्यान, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबाबत माहिती दिली. राज्यात आत्तापर्यंत तब्बल 15 लाख हेक्टर शेतीचं अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे या शेतकऱ्यांना आता मदत मिळणार आहे.




No comments:

Post a Comment