लोकमन महाराष्ट्र न्यूज
तालुका प्रतिनिधी : (दादासाहेब आगळे)
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शासनाच्या वतीने हर घर तिरंगा हा उपक्रम दिनांक ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट राबवण्याचे आव्हान नागरिकांना करण्यात आले आहे. या अभियानाचा प्रसार करण्यासाठी गुरुवार दिनांक ११ आॅगस्ट २०२२ रोजी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संचलित न्यू इंग्लिश स्कूल गुंडेगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढली होती.
तिरंगा हमारी शान है ,भारत का अभिमान है ! भारत माता की जय ! अश्या अनेक घोषणा देत विद्यार्थी विद्यार्थिनी यात सहभागी झाले होते. काही विद्यार्थी महात्मा गांधी, माता जिजाऊ,राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले अशा वेशभूषेत आले होते. हातात देशभक्तीची घोषवाक्ये असणारे फलक,तिरंगी झेंडे घेवून निघालेल्या या विद्यार्थ्यांच्या फेरीने गावातील नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब गायकवाड,परशुराम साबळे,मगर सर,वाळके सर,भोईटे सर,खडके मॅडम,पारेकर मॅडम,जाधव मॅडम,लोखंडे,अनिल कोतकर,भापकर आदी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी,नागरिक फेरीत सहभागी झाले होते.
यावेळी विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत सदस्य संतोष धावडे, पत्रकार संजय भापकर यांनी स्वातंत्र्याच्या इतिहासाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी संपूर्ण आठवडा हा 'हर घर तिरंगा' या उपक्रमाच्या प्रसारार्थ शाळेत चित्रकला, रांगोळी, वेशभूषा स्पर्धांचे आयोजन शाळेत करण्यात आले असून सोशल मीडियावर त्याला प्रसिद्धीही देण्यात आलेली आहे.
तसेच याविषयी अधिक लोकजागृती करण्याच्या उद्देशाने गावातील चौकात सभांचेही आयोजन करण्यात आलेले आहे.उपस्थितांमध्ये संतोष सकट,पत्रकार दादासाहेब आगळे,माजी सैनिक संघटना सदस्य राहुल चौधरी, कारभारी आगळे, शामराव कासार, अब्बास शेख,सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य,गावातील नागरिक यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सहाय्य केले असून सर्व उपक्रमांना पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.







No comments:
Post a Comment