नगर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही समृद्धी महामार्गा प्रमाणे मोबदला द्यावा.
अन्यथा मोठे आंदोलन उभा करू राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम अण्णा शेलार
चिचोंडी पाटील (प्रतिनिधी) : सोहेल मनियार
नगर तालुक्यातून जात असणाऱ्या सुरत चेन्नई महामार्ग संदर्भात आज चिचोंडी पाटील समाधान मंगल कार्यालय सांडवा फाटा येथे हा मेळावा पार पडला.
यावेळी चिचोंडी पाटील, दशमीगव्हाण,भातोडी,मदडगाव, कोल्हेवाडी,सारोळा,शहापूर, कापूरवाडी, शेंडी, पोखर्डी, पिंपळगाव तसेच आष्टी तालुक्यांतील अनेक गावे व बार्शी, परंडा या भागातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना लोकनेते घनश्याम आण्णा शेलार यांनी सांगितले की देशात सर्वाधिक मोबदला दिलेल्या समृद्धी महामार्गाचा दर या भागातील शेतकऱ्यांना मिळून देणारच , नुकसान भरपाईचे दर जाहीर केल्याशिवाय अधिग्रहण प्रक्रिया पार पाडू नये अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन मोठे आंदोलन करू असा इशारा दिला.
शेतकऱ्यांच्या 7/12 वरील नोंदी. महामार्ग लगत सर्विस रोड. जमिनीच्या मधून हा महामार्ग आडवा तीडवा जात असल्याने जमिनीचे त्रिकोणी षटकोनी तुकडे होत असून त्यामुळे जमिनी नापीक होण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.
त्याचबरोबर मुख्य रस्त्यापासून शिवार वाटा,गाडीवाटा बंद होणार असून त्यामुळे जमिनी पडीक पडण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. काही शेतकरी यामध्ये भूमीहिन होत आहेत,
काही शेतकऱ्यांची यामध्ये घरे, गोठे,विहिरी,शेततलाव,भुसारे, शेड,कोंबडी फार्म जात असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी घाबरून गेलेले आहेत. या सर्व शेती उपयोगी साधनांची 7/12 वर नोंद घेण्यात यावी.
काही शेतकऱ्यांच्या विहिरी, शेत तलाव, बोरवेल्स जात असून विहिरीवर अवलंबून असणाऱ्या बागायती जमिनी त्यामुळे पडीक पडणार आहेत. त्यामुळे मूल्यांकन करत असताना या उर्वरित पडीक होणाऱ्या जमिनींचे ही मूल्यांकन करावे व याबाबत शासन निर्णयात आत्ताच निर्णय घेऊन नुकसान भरपाई द्यावी.
यावेळी शरदभाऊ पवार, प्रकाशजी पोटे,प्रवीण कोकाटे, आबासाहेब कोकाटे सर,डॉक्टर ससे, शरद गुंजाळ,मच्छिंद्र खडके, प्रल्हादशेठ खांदवे,साहेबराव शेडाळे, प्रभाकर आगरकर, भास्कर खडके,जयसिंग काळे, वैभव कोकाटे,दादासाहेब पवार,संतोष कोकाटे,संतोष खराडे,राजेंद्र पवार यांनी बोलताना सांगितले की शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्यास
महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली या शेतकऱ्यांना घेऊन मोठे आंदोलन उभे करू असा इशारा दिला.
प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आम्हाला कुठलीही नोटीस पूर्वसूचना न देता अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू केल्यामुळे समस्यांचा पाढाच या महाविकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांसमोर मांडला.
यावेळी भूमिपुत्र कृती समिती स्थापन करण्यात आली.
ज्यांनी हा मेळावा घडवून आणला असे युवानेते शरदभाऊ पवार यांची शेतकरी भूमिपुत्र कृती समितीचे निमंत्रक पदी सर्वांच्या वतीने निवड करण्यात आली.
महामार्ग गेलेल्या प्रत्येक गावात भूमिपुत्र कृती समितीचे 5 ऍक्टिव्ह सदस्य राहणार असून त्यांच्या माध्यमातून प्रत्येक गावातील शेतकऱ्यांना पुढील आंदोलनाविषयी माहिती देण्यात येईल.व आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येईल.
सातबारा वरील नोंदी व इतर हक्कातील नोंदी, शेतकऱ्यांनी कर्ज काढल्यामुळे व पतसंस्था बँक व खाजगी सावकारांच्या नावे सातबारा झाल्यामुळे या संदर्भात येत्या मंगळवारी महसूल अधिकारी व तहसीलदारांना कृती समिती भेटणार.
यावेळी परिसरातील सर्व शेतकरी व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









No comments:
Post a Comment