मुंबई (प्रतिनिधी)
मागील काही दिवसांमध्ये शिवसेनेत मोठी बंडखोरी झाली. त्यानंतर आता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी मोठे विधान केले.
यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेने या पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढवल्या पाहिजेत, मी उद्धव ठाकरे यांना रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात दौरा करणार असल्याची कल्पना दिली आहे.
शिवसेना संकटात असताना पाठीशी राहणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे. तसेच आता उभा महाराष्ट्र शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्वीकारल्या शिवाय राहणार नाही, शिवसेनेनं फक्त आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवाव्यात, अशी मागणी अनंत गीते यांनी केली.
शिवसेना कोणाची? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, शिवसेनेचा कोणताही वर्ग करता येणार नाही, यावर निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल? तर एखाद्याला गद्दार शब्द लागत असेल तर त्यांनी आपण शिवसैनिक आहोत का? हे सांगावे.
शिंदे गटाची दखल कोणीही घेण्याची गरज नाही. गद्दारी माझ्या रक्तात नाही, तसेच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात नवीन उमेदवाराचा उदय होणार आहे, तसेच कोर्टाच्या निकालानंतर शिंदे सरकार कोसळेल, असं वक्तव्य अनंत गिते यांनी केले. याबरोबरच रायगडमधील तीन, रत्नागिरीतील दोघांना धूळ चारण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे, असे आवाहन गीते यांनी केले.







No comments:
Post a Comment