Monday, July 25, 2022

'आजचं राजकारण म्हणजे शंभर टक्के सत्ताकारण'- नितीन गडकरी

लोकमन महाराष्ट्र न्यूज


मुंबई (प्रतिनिधी) : 

आज राजकारण म्हणजे शंभर टक्के सत्ताकारण झाल्याची खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे. ते नागपूरमधील ज्येष्ठ समाजसेवक गिरीश गांधी यांच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमात गडकरी बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे देखील उपस्थित होते. गडकरी यांच्या या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.


यावेळी गडकरी म्हणाले की, राजकारण या शब्दाचा अर्थ समजून घेण्याची वेळ आली आहे. राजकारण हे समाजकारण आहे? राष्ट्रकारण आहे? विकासकारण आहे? की सत्ताकारण आहे? हे आपण समजून घ्यायला पाहिजे.


महात्मा गांधींपासून ज्या राजकीय परंपरेने कार्य झालं त्यात राजकारण हे समाजकारण, राष्ट्रकारण, विकासकारण होतं. आता मात्र शंभर टक्के सत्ताकारण झालं आहे, असेदेखील नितीन गडकरी म्हणाले.


गडकरी पुढे म्हणाले की, मला अनेकदा राजकारण कधी सोडावं असं वाटतं, कारण आयुष्यात राजकारण सोडता अनेक गोष्टी करण्यासारखा आहेत अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.


राजकारणात गुणात्मक परिवर्तन एक प्रक्रिया आहे. थोर पुरुषांपासून आपल्याला प्रेरणा मिळते. सगळ्या विश्वाचं कल्याण व्हावं, अशी आपली संस्कृती आहे, असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.



No comments:

Post a Comment